Translate

Friday, November 30, 2018

मित्राशी भेट

                मित्राशी भेट 
ठाणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहूल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात नविन असल्याने सुरुवातीला त्याचे फ़ारसे मित्र नव्हते. हळुहळु त्याचे गावात नविन मित्र झाले. तो जेव्हा ५ वी ला होता. तेव्हापासुन ते आता त्याची १५ वी झाल्यानंतर त्याच्या मित्रांशी बोलने-चालने फ़ारसे कमी झाल्याने तो नेहमी अस्वस्थ असायचा. कारण स्थलांतर दुरच्या शहरात झाले होते. 

        एकदा तो असाच मित्रांना भेटायला गावात आला होता. तेव्हा काही मित्रांशी भेट झाली. तर काही मित्र कामात गुंतल्यामुळे भेट होऊ शकली नाही. कारण तो सकाळी ६ वा. राह्त्या घरातुन निघाला होता. व मित्रांकडे ११ वा. पोचला. तरीही काही मित्रांना सुट्या नसल्याने त्याला घरी परतावे लागले. 

Company भाग - ३

        Company भाग - ३

     मुंबई शहरातील एका नामवंत परिसरात एक अजय नावाचा मुलगा कामाला होता. तो कामाच्या ठिकाण्याहुन लांब अगदी ३ तास अंतरावर असल्याने तरीही त्याला त्याच्या कामातील साहेब कामाला लवकर बोलवत. एकदा काम जास्त असल्याने त्याला खुपवेळ थांबवले. अगदी ८:३० ते ९:१० वा.पर्यत.. मग त्याचा पगार इतका फ़ारसाही नव्ह्ता. त्यामुळे घरातील माणसे त्याला सारखे बजावुन सांगत की, तु काम सोडुन दे.. नको जाऊ कामाला ! घरीच बस ! मग एका दिवशी त्याने त्याच्या साहेबाला विचारले की, साहेब माझा पगार वाढवा.. नाहितर मला काम सोडावे लागेल.. तेव्हा हे बोलताना साहेबांनी त्याला काही पर्याय दिले..

 १) तुला जास्तीत जास्त ११ हजार रु. वाढवुन देऊ शकतो.

 २) तुला काम सोडायचे असेल तर, तुला २० दिवस अजुन काम करुन तु काय शिकला आहे. हे इतर लोकांना  शिकवायला लागेल. तेव्हा तुझा पगार आणि अनुभव अर्ज देता येईल.

३) तुला आजच काम सोडायचे असेल तर, तुला काहीच मिळणार नाही.

     तेव्हा थोडावेळ विचार करुन त्याने दुसरा पर्याय निवडला. पण संध्याकाळी झाल्यावर त्याच्या साहेबाने वेगळाच चुकीचा आरोप लावल्यामुळे त्याला काम स्वत: हुन सोडावे लागले.

Thursday, November 29, 2018

Company भाग - २

             Company भाग - २
 
   मावळ तालुक्यातील एका गावात एक मोठी कंपनी होती. त्या कंपनीत काही परमनंट तर काही तातपुरते कामगार होते. त्या कामगारांमध्ये रामदास नावाचा एक कामगार होता. तो कामात अचुक व प्रामाणिक असल्याने तो कंपनी साहेबांचा आवडता होता. त्यामुळे काही कामगार हे त्याच्यावर जळत होते.
  एका दिवशी दुपारी ३:३० वा. शिप्ट असल्याने तो कंपणीत वेळेवर गेला. त्यादिवशी १४ आॅगस्ट असल्याने कंपनीमध्ये १५ आॅगस्ट हा आधीच्या दिवशी साजरा होणार होता. दुपारी ४ वा. नंतर कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी ७ वा. साफ़-सफ़ाई करायला सुरुवात केली. साफ़-सफ़ाई झाल्यावर १० वा. सजवण्याचे काम सुरु केले. रात्री ११:४५ ला काम संपल्यावर रामदास आराम करण्यासाठी एका कोपरात गेला. जमीनीवर पडताच त्याला झोप लागली. १२ वाजले जायचा वेळ झाला. तेव्हा रामदास तेथे दिसत नसल्याने कामगाराने दुसरा कामगाराला विचारले. पण त्याने सांगितले की, रामदास आधीच निघुन गेला. तेव्हा रामदास एकटाच आत राहिला. रामदासला रात्रीचे १ वा. जाग आली तेव्हा तो इकडे-तिकडे पाहायला लागला. तर सर्वत्र अंधार होता.  तो कसा-बसा बाहेर आला. तेव्हा दुसरा दिवशी बोलता-बोलता विषय निघाला म्हणुन त्याला कोंडुन कोणी ठेवले हे प्रत्यक्ष उघड झाल्यामुळे त्या कामगारांना कंपनीतुन बाहेर काढले.

Wednesday, November 28, 2018

मंदिर

                 मंदिर
 

     ठाणे जिल्ह्यातील एका गावात एक १२ घरे मिळुन चाळ होती. त्या चाळीत काही मराठी माणसे तर काही इतर जातीतील लोक त्या चाळीत राहत होते. त्या चाळिचा मालक हा एक म्हतारा ५० वर्षाचा असुन तो त्या चाळितील देखरेख करत असे. चाळित एक शंकर देवाचे मंदिर होते. त्या मंदिरात तो सकाळ-संध्याकाळ आरती करत असे. एकदा पावसाळ्यात नदिला पुर आल्यामुळे नदिचे पाणी चाळीत आले. कारण चाळ नदीपासुन जवळ असल्ल्याने चाळितील घरामध्ये पाणी भरले. शेवटी पाणी मंदिरातील शंकराच्या पिंडीपर्यत जाणार होते. तेवढयात त्या माणसाने मंदिरात दिवा लावल्यामुळे पाणी कमी होत गेले. तेव्हापासुन मंदिरात लोकांची खुप गर्दी होत गेली. एकेदिवशी चाळिचा मालक अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याची बायको आजारी पडल्याने तिचे निधन झाले. शेवटी त्या मालकाच्या मुलांकडे चाळितील खोल्याचे अर्धे-अर्धे हिस्से झाले. पण ती चाळ तशीच राहिली.



-------------------------------------------**************--------------------------------------------------

Sunday, November 25, 2018

शाळेत १५ आॅगस्ट साजरा

                             शाळेत १५ आॅगस्ट साजरा
 

         
   ठाणे शहरातील एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब होता. लहानपणापासुन त्याच्या घरची परिस्थिती खुप बिकट होती. घरात वडील,आई, एक भाऊ असा त्याचा कुटूंब होता. तो प्राथमिक शाळेत शिकायला होता.
  

             एकदा शाळेत १५ आॅगस्टचा कार्यक्रम होता. त्यादिवशी राम सकाळी लवकर ६:३० वा. घरातुन निघाला. आणि झेंडा विकत घ्यायचा असल्याने तो दुकानात गेला. तेव्हा काही दुकाने उघडी नसल्याने तो कंटाळला. शेवटी एका दुकानात त्याला झेंडा मिळाला. लगेच तो शाळेत पोहचला. शाळेत झेंडा फ़डकवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रम झाल्यावर प्रमुख पाहुण्याना शाळेतर्फ़े नास्टा असल्याने पाहुण्यांनी तो आवडीने खाल्ला. मग काहीवेळाने टाॅयलेट बाहेर पाहुण्यांच्या रांगा लागल्या. टाॅयलेट  असे होते की ते वर्षभर बंद असल्याने त्यात पाण्याची सोय नव्हती. तरीही पाहुण्यांनी सोबत बिसलरी बाट्ल्या सोबत नेल्या. काही पाहुण्यांची तबियत खराब असल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. तेव्हा  १५ आॅगस्ट हा पाहुण्यांचा चांगलाच दवाखान्यात गाजला.


-------------------------------------*****************-------------------------------------------

Saturday, November 24, 2018

शाळेचा माॅनेटर

                     शाळेचा माॅनेटर 


           एका गावात कल्पेश नावाचा मुलगा राहत होता. तो १० वी ला असल्याने शाळेत हुशार विद्यार्थी असल्याने वर्गात त्याची माॅनिटर म्हणुन निवड झाली. तो हुशार असल्याने तो सर्व शिक्षकांचा आवडता होता. शाळेत एकदा सराव परिक्षा होती. तेव्हा मॅडमना काम जास्त असल्याने सरांनी त्याला वर्गाकडे लक्ष द्यायला सांगितले. त्व्हा काही मुले मस्ती करत होती. खुपवेळ असाच गेला. त्याच्या सांगण्याहुन, फ़्ळ्यावर नावे लिहुनही ती ऎकत नव्हती. मोनिश , राकेश, नितेश, शिवाजी, भुषण अशी ५ ते ६ जण मागे बसून मस्ती-गोगाट करत होती. तर बाजुला मुली शांत बसल्या होत्या. मुलांचा गोगाट एेकुन मुलीही बोलू लागल्या. तेव्हा शिवाजीकडे मोबाईल होता.

         कल्पेशला हे माहीत असल्याने कल्पेश शिवाजीच्या कानात ह्ळुच बोल्ला की, काय रे ! पिच्चर आहे का ? मग शिवाजी बोल्ला आहे ना ! "HD" आहे. पण मॅडम मोबाईल घेतील म्हणुन खिशात ठेवला आहे. मग कल्पेश बोल्ला की, मी आहे ना ! सर नाही घेणार मोबाईल.. तु काढ खिशातुन... तेव्हा कल्पेश बाकीच्या मस्ती करत असलेल्या मुलांकडे गेला. तेव्हा त्यांना बोल्ला, "तुम्हाला मी पिच्चर बघुन देतो. पण गोगाट करायचा नाही. तेव्हा मुलांनी हे मान्य केले. आणि काही वेळातच मुले अचानक शांत झाली. हे मुलींनी पाहताच त्यांना आश्चर्य झाला. तेव्हा एका मुलीने मुलांकडे पाहिले तर्, तीला दिसले की मुले शिवाजीच्या मोबाईलमधुन काहीतरी बघत होता. तेव्हा मुले पिच्चर बघताना लाजत असल्याने मुली वेगळाच अर्थ काढत होती.

        काही वेळाने मॅडम वर्गात आले तेव्हा त्यांना वर्ग शांत दिसला. तेव्हा सरांनी शांत बसण्याचे कारण विचारल्यावर एका मुलीने सांगितले की, मॅडम मुले शिवाजीच्या मोबाईल मधुन काहीतरी बघत होती. मॅडमने शिवजीला विचारले की काय आहे मोबाईल मध्ये मला दाखव.. तेव्हा शिवाजीने मॅडमला मोबाईलमधले दखवताच मॅडमला ते विचित्र दिसले. त्यामुळे मॅडमने त्याला त्याचा मोबाईल लगेच दिला. तेव्हा तेथे अक्षय नावाचा बसला होता. त्याने विचारले की, शिवाजी काय दाखवले की, मॅडमने तुझा मोबाईल लगेच दिला ? तेव्हा शिवाजी बोल्ला, " अरे मोबाईलमध्ये पिच्चरच अशे आहेत की, मॅडला लाज वाटली. म्हणुन मोबाईल दिला.



--------------------------------------------**********------------------------------------------------------

Friday, November 23, 2018

शाळेची सहल डोंगरावर

          शाळेची सहल डोंगरावर
                                                                                                                               दि. १४ जुलै २०१० 
 
 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
           

          ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.

            आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.

                                                            
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------

Thursday, November 22, 2018

शाळेत आणली दारु

                                                               शाळेत आणली ताडी!! 


  



        एकदा मी शाळेत गेलो. तेव्हा शाळेत परिक्षा होती. आज शेवटचा पेपर असल्याने मुलांचा शाळा सुटल्यावर फ़िरण्याचा विचार चालला होता. तर एकीकडे दोन मित्र रोहन आणि मोहन या दोघांचा वेगळाच विचार चाल्ला होता.

     
        पेपर संपल्यावर दोन तास हे शारिरीक शिक्षण असल्याने मुलांना बाहेर खेळायला जायचे होते. तेव्हा सरांनी बाहेर सोडलेच नाही. मग तेव्हा त्यादिवशी पेपर संपल्यावर ताडी पिण्याचा रोहन आणि मोहन यांचा विचार होता. आणि दुसरा दिवशी शिवटच्या दिवशी त्यांनी २ बाटल्या भरुन ताडी आणल्या. मग त्या दोघांना कळले की बाहेर जायला मिळणार नाही. तेव्हा काही मुले मस्तीही करत होते. तेव्हा रोहनने बॅगीतुन ताडीची बाटल्या काढल्या. 


      
       एक बाटली रोहनने घेतली तर एक बाटली मोहनने घेतली आणि दोघांनी दोन-दोन घोट घेतल्यावर ताडी चढली. मग वर्गात मुली होत्या. मग मुलींच्या जवळ जाऊन वेगळ्या प्रकारे वर्तन करु लागले. "चल येते का, फ़िरायला, माझी बायको होशील का ? अशा प्रकारे वेगवगळी क्रुत्ये करु लागली. तेव्हा एका मुलाने सरांना बोलावुन आणले. तेव्हा ह्या दोघांनी बघताच रोहन मुलाला बोल्ला की काय रे ! हिच्या बापाला बोलावुन आणले का ? चांगलं केले. चला सासरेबुवा आमचे लग्न लावुन द्या. मग सरांनी त्यांची चांगलीच ताडी उतरवली. दोघांचा चेहरा बघण्यासारखा होता.

Wednesday, November 21, 2018

जंगलातील फ़ळे

                                         जंगलातील फ़ळे     
         आज शनिवार म्हणुन उद्या रविवार.. उद्या काय कारायचे ? याचाच विचार चाल्ला होता. तेवढ्यात संदेश बोल्ला की उद्या मस्त मोरणं खायला जोगमोरीवर जाऊ. तेव्हा रवि आणि संदेश हे दोघे जवळ तर जितेश आणि मी गावात असुन लांब राहत होतो.

         मग रविवारचा दिवस.. आज मी सकाळी ९ वाजता जितेशच्या घरी जायला निघलो. घरी गेल्यावर जितेश लगेच रविच्या घरी जायला निघला. मग आम्ही दोघे रविच्या घरी पोहचल्यावर रविने कौत्या घेतला आणि रस्त्यावर संदेश वाट बघत आहे, असे रविने सांगितल्यावर आम्ही तिघे रस्त्यावर निघलो. रस्त्यावर संदेश दिसला. मग त्याने एक मधमाशाच्या पोळ्याच्या झाडाकडे नेले. झाडावर रवि कौत्या घेऊन चढला. सोबत त्याने मोठा कपडा आणला होता, तो त्याने तोडावर बांधला होता. मग खाली संदेशने धुर केला. त्यामुळे मधमाशा पोळ्यापासुन दुर जात होत्या. तेवढ्यात रविने पोळा कापायला सुरुवात केली आणि खाली जितेश आणि मी मध टिपत होतो.

     मध टिपुन झाल्यावर रस्त्याच्या पलिकडे आत जाऊन आम्ही मध खायला सुरुवात केली. मध खाऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो.. पुढे तोरन्याचे झाड दिसले. झाडावर संदेश चढला.. मग संदेशने झाडावरचे तोरने काढली आणि मग सगळ्यांना खायला दिली. त्यानंतर आम्ही जांबळीच्या झाडाकडे गेलो, खुप सारी जांबळी खाऊन आम्ही जंगलातुन संध्याकाळी घरी आलो.

Tuesday, November 20, 2018

शर्टावर उल्टी

       शर्टावर उल्टी
        काल रविवार होता. त्यामुळे कालच्या सुट्टीनंतर आज सोमवार असल्याने आज १०:३० वा. शाळा होती. त्यामुळे मी १०:१५ मी. शाळेत गेलो. शाळेत गेल्यावर शाळेची प्रतिन्या झाल्यानंतर वर्गात गेलो. १ ला तास मराठीचा. तेव्हा वर्गशिक्षक पाटिल मॅडम होत्या. मॅडमनी हजेरी घेतल्यानंतर मॅडमने शिकवायला सुरुवात केली. मॅडमचा तास संपल्यावर गणिताचा तास होता. गणिताच्या तासाला गंभीरराव मॅडम असल्याने त्या अभ्यासाला कडक  होत्या. शनिवारी मॅडमने गणितं दिली होती, ती गणितं आज मॅडम तपासणार होत्या. तेव्हा गणितात मी कच्चा होतो. माझ्याबरोबरच माझे मित्र संदेश,रविंन्द्र,मनिश,मोनिश,राकेश,जितेश हेही माझ्यासोबत मार खायला आले. कारण आमचा वर्ग शेवटी क होता. म्हणुन मस्तीही भरपुर असायची. मॅडमचा तास संपल्यावर हिंदीचा तास होता. तेव्हा तासाला सर होते. सरांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना झोपा आल्या. कारण सरांच्या तासाला सगळ्याना कंटाळा यायचा. तेव्हा शेवटुन दुसरा बॅचवर संदश आणि देविदास बसले होते. तेव्हा देविदासला गरम व्हायला लागले. संदेशचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. अचानक देविदास संदेशला बोलणार.. तेवढयात देविदासला जोरात उलटी आली. आणि ती थेट संदेशच्या शर्टावर.. सदेशचे पुर्ण शर्ट माखल्यामुळे सरांनी त्याला शर्ट धुवायला नदीवर पाठवले. तेव्हा संदेशने देविदासला विचारले की, "तु पहिले सांगता येत नव्हता का ?" तेव्हा तो म्हणाला, " तु सांगणार होतो. तेवढ्यातच आली." मग देविदास ल्याला बघुन हसायला लागला. तेव्हा संदेश त्याला म्हणाला, " शाळा सुटल्यावर भेट.. मी तुला चांगलाच भेटतो.." शाळा सुटल्यावर संदेश देविदासला शोधायला लागला. पण तो त्याला दिसलाच नाही ! कारण शाळा सुटतास तो शाळेच्या मागुन धावत घरी गेला होता..

Monday, November 19, 2018

कर्कटकने खुण

                                               कर्कटकने खुण
   एका गावात रितेश नावाचा मुलगा होता. तो ६ वी मध्ये शिकत असल्याने त्याचे शाळेत खुप मित्र होते. तो शाळेत खुप मस्ती करत असल्याने शिक्षक त्याला कंटाळुन गेले होते. एकदा सकाळी ७ वा. शाळा होती. कारण त्यादिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. त्यामुळे तो लवकर शाळेत गेला. पण शाळेत ७ वा. १५मी. पोहचल्यावर त्याला शिक्षा झाली. मग सरांनी त्याला दोन छड्या हातावर मारुन वर्गात घेतले. २ तास शिकवुन झाल्यावर पुढचा तास मराठीचा होता. तेव्हा मॅडमचा तास असल्याने मॅडमला वर्गात यायला उशिर होणार होता. तेव्हा त्यावेळी वर्गात अशीच तिन-चार रितेशला पकडुन मस्ती चाल्ली होती. तेव्हा ही मस्ती रविश,दत्ता,मनिश यामध्ये होती. मनिश हा कोपरात तर रविश मध्ये तर रितेश हा त्याच्या बाजुला आणि दत्ता त्याच्या पुढे बसला होता. मग रितेशने रविन्द्रला डालडा चिडवायला सुरुवात केली. कारण रविशच्या नाकातुन सतत शेंबुड असल्याने त्याला डालडा म्हणुन रितेश चिडवायला लागला. तेव्हा त्याच्या पाठोपाठ नितेश,मनिश हे दोघेही सुरु झाले. मग रविशला भयंकर राग आल्याने त्याच्या समोर कंपास पेटी होती. 
      त्या कंपास पेटीमधुन त्याने कर्कटक काढले आणि रितेशच्या पोटात मारले. तेव्हा त्याच्या शर्टातुन रक्त आल्याचे दिसल्याने दत्ता,मनिश हे घाबरले, आणि तेवढयात त्याला आॅफ़िसकडे जायला सांगितले. तेव्हा तो जात होताच तर रस्त्यात मॅडम दिसल्या, मॅडमने विचारले की, काय झाले ? तेव्हा मनिशने सांगितले की याला रविशने कर्कटक मारले आहे. मग मॅडम त्याला आॅफ़िसमध्ये घेऊन गेल्या आणि तिथे सर होते. त्या सरांना मनिशने संपुर्ण प्रकार सांगितला. तेव्हा सरांनी रविशला आॅफ़िसमध्ये बोलावले. मग सरांनी त्याला मारायला सुरुवात केली. आणि मनिशला रविशच्या आईला बोलावुन आणायला सांगितले. तेव्हा काही वेळाने रविशची आई तिथे आली. आणि तिला हा प्रकार सांगितला. तेव्हा तिनेही रविच्या कानाखाली दोन मारल्या. नंतर सरांनी रितेशला घरी पाठवले. 

Sunday, November 18, 2018

प्रकल्पाच्या नावाने पैसे

                                          प्रकल्पाच्या नावाने पैसे
    दिनेश नावाचा मुलगा होता. तो ८ वीत असल्याने शाळेचा गणवेश बदलला. सफ़ेद शर्ट आणि खाकी पॅट असा शाळेचा गणवेश. शाळेत ग्रहपाठाच्या नावाने अभ्यास भरपुर असायचा. शाळेत वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही, अशा दोन वह्या तर वाढल्या. पण तसेच विषय ९. गणित, मराठी, हिंदी,समाजशास्ञ असे विषय असताना वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही व्हायच्या. मग वह्या पुर्ण नसल्या तर शाळेत मार मिळायचा. म्हणुन वह्या नेहमी पुर्ण कराव्या लागत होत्या. एकदा ग्रहपाठाच्या वह्या पुर्ण नसल्याने शिक्षकाने त्याला शिक्षा केली. त्यामुळे तो नेहमी वह्या पुर्ण ठेवु लागला.
 एकदा प्रकल्प करण्याचे सरांनी ठरवल्यावर सगळ्यांना ग्रुप मिळुन विषय देण्यात आले होते. मग दिनेश हा ग्रुप प्रमुख असल्याने प्रकल्पाचा संपुर्ण खर्च त्याच्या ग्रुपमधील मुलांकडुन घ्यायचा होता म्हणुन ५ मुलांचा ग्रुप असल्याने पुढील तपशील प्रमाणे पैसे काढले: 



 

मग प्रत्येकाकडुन १० रु प्रमाणे ५ मुलांचे ५० रु. आणि उरलेले पैसे १९ रु. 

अशा प्रकारे त्याने पैसे गोळा करुण मुलांना न कळता प्रकल्पाचे पैसे खाल्ले. 

Saturday, November 17, 2018

शाळेच्या कामात फ़ुकट पैसा

                                                  शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
      शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...

Friday, November 16, 2018

शाळेत एकदा चित्रपट

                                                शाळेत एकदा चित्रपट  
    लहानपणी शाळेत जायला कंटाळा यायचा. मग शाळेत आज काही नविन आहे की नाही, याची उत्सुक्ता सतत लागत होती. एकदा पावसाळ्यात शाळेत जायला त्रास वाटत होता. कारण रस्त्यावर सगळीकडे चिकल साचल्याने रस्त्याने जायला खुप त्रास होत होता. तरीही कसेबसे चिकलातुन जायचे आणि शाळेत वेळेवर पोहचायचे. मग त्यादिवशी पाऊसही खुप होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मग २ वाजता एक माणुस आला. त्याने प्रथम मुख्याध्यापकाची भेट घेतली. नंतर त्याने आमच्या वर्गात एक सफ़ेद कपडा फ़ळ्यावर लावला. मग एक मोठी मशीन होती, त्या मशीनीवर एक मोठी सपाट प्लेटसारखी कॅसेट त्याने त्या मशीनीमध्ये टाकली आणि मग पडद्यावर एक चित्रपट लागला. चित्रपट हा एक गावातील लोकांवर अवलंबून असल्याने सर्वाना तो चित्रपट खुप आवडला. मग चित्रपट संपल्यावर त्या माणसाने आपले सामान आवरुन त्या मुख्याध्यापकाकडुन आदण्या घेतली. मग सर्व मुलांनी त्या माणसाला आनंदाने पैसे दिले. कुणी १ रु तर कुणी २ रु. दिले. मग पैसे घेऊन तो माणूस शाळेतुन निघुन गेला.

Thursday, November 15, 2018

५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

                                      ५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

   ५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.

असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.

 मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.

Wednesday, November 14, 2018

शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट

                                 शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट

      शाळा ही सर्वाना प्रिय असते असे नाही. शाळेत मुलांना शिकवलेले कहीच समजत नाही. अशी तक्रार सर्व शिक्षकांची होती. मग शिक्षकांना एक युक्ती सुचली. शिक्षकांनी सर्व वर्गात टि.व्ही लावला. आणि त्यात छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट लावला. चिञपटमध्ये महाराजांचे संपुण सुरुवातीपासुनचा प्रवास दाखवला होता. मग मध्येच वर्गात लाइटही सारखी जायची. आणि लाइट आल्यावर सर्व मुलांचा गोंगाट व्हायचा. मग शेवटी चित्रपट पुर्ण बघून झाल्यावर शिक्षकांनी मुलांना काही प्रशन्न विचारले, मग त्या प्रशनाचे उत्तर मुलांनी अचुक दिल्याने सर्व शिक्षकांनी एकांत होऊन म्हटले की, आपल्या युक्तीचे चिज झाले.

Tuesday, November 13, 2018

शाळेत मस्ती

                                शाळेत मस्ती
   शाळेत गेल्यावर रोजप्रमाणे नविन पाहायला मिळते. आज रोजसारखे शाळेत गेल्यावर सकाळी सरांनी थोडेफ़ार शिकवले. नंतर दुपारी जेवनाची सुट्टि झाली. सुट्टित जेवणाचा डब्बा खाल्ला आणि मग मित्रानी मस्ती करायला सुरुवात केली. मस्ती डब्बा धुताना झाली. तिही चंदन आणि शाम मध्ये, चंदनने मुद्दावुन डब्बा धुताना शामच्या अंगावर पाणी टाकले त्यामुळे शामला राग आला आणि शामने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या तावडीत सापडलाच नाही. नंतर चंदन त्याला बाहेर चालताना दिसला, मग त्याठिकाणी रस्त्यावर एक ब्लेड पडले होते. ते ब्लेड त्याने उचलले आणि आपला बदला बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या खांद्यावर ब्लेड मारले. तेवढयात रक्ताच्या धारा वाहु लागल्या आणि चंदन जोरात रडु लागला. तेवढयात सर आले मग सरांनी त्याच्या जखमेवर मलम पट्टी केली आणि त्याला घरी पाठवले. शामला सरांनी खुप धुतला. दुसरा दिवशी शाळेत पालकांना आणायचे असे त्याला सांगितले. त्यामुळे हि मस्ती शामला खुप महाग पडली.

Monday, November 12, 2018

२ री ला दुसरा वेळी पास

                               २ री ला दुसरा वेळी पास
     २री ला शाळेत अभ्यासाचे नविन विषय आले. तरीही त्यात नविन होते ते विषय. गणित विषय हा कठिण असल्यासारखा झाला. शाळेत गणित शिकवायला शिक्षिका होत्या, पण त्याचा काहिच फ़ायदा झाला नाही. शेवटी घरातल्यानी शिकवणी लावली, पण तेही वाया गेले. शेवटी वाषिॅक परिक्षा आली. परिक्षामध्ये गणित विषय खुप कठिण गेला. मग रिझल्ट आल्यावर गणित विषय गेल्याचे कळले. गणितात २ गुण घरातल्याना कळल्यावर घरातल्याना शिक्षकांनी बोलावले, शिक्षकांनी सागितले की, याला काहीच समजत नाही म्हणुन त्याला नापास करावे लागले. असे दोन वर्षी सलग झाले. मग तिसरा वर्षी नविन शिक्षक आले. मग शिकवलेले थोडेफ़ार समजायला लागले. नंतर वार्षिक परिक्षेत दुसरा क्रमांक आल्याने घरातली खुप खुश झाली.

Sunday, November 11, 2018

१ ली चा वर्ग

                                            १ ली चा वर्ग
   शाळेचा पहिला दिवस. शाळेत नवीन मुलं-मुली व शिक्षक. पहिला दिवस म्हणुन शिक्षकांनी मुलांची ओळख करुन घेतली. मग पहिल्या दिवशी फ़ारसे शिकवले नाही. मग ५ वाजले आणि शाळा सुटली. मग घरी गेल्यावर विचार केला की, उद्या सर काय शिकवणार ? त्याचा अभ्यास केला. मग मित्रांसोबत खेळुन घरी आलो. मग उद्या १२ वाजता शाळेत जायचे म्हणुन सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. म्हणून सकाळी ९ वाजता उठलो. अंघोळ केली. मग खेळायला गेलो. ११:३० वाजता शाळेत गेल्यावर सरांनी शिकवायला सुरुवात केली. मग पहिला दिवस चांगला गेला. मग अशेच २ महिने गेले. मग मला लिहायला आले. मी एकदा मॅडला वहिवर लिहुन दाखवले, तेव्हा मॅडने मला शाबासकी दिली. त्यानंतर आमची वार्षिक परिक्षा आली. परिक्षामध्ये काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी नापास झालो.

Saturday, November 10, 2018

म्हात्रे बिल्डींग

                                            म्हात्रे बिल्डींग
          रत्नागिरी जिल्ह्यात एक राहुल नावाचा १२ वर्षिय मुलगा मुंबईहुन  रत्नागिरी जिल्ह्यात एका मलकापुर नावाच्या गावात म्हात्रे बिल्डींग म्हणुन नुकताच स्तलांतरीत झाला होता. त्याचे कारण होते, त्याच्या वडिलांची बदली. त्यामुळे नविन घरात त्याला वेगळे वाटत होते. त्याचे अॅडमिशन तेथील स्थानिक शाळेत केले. शाळेत त्याला नविन मित्र मिळाले. विकी आणि कल्पेश हे दोघे त्याच्या बिल्डींगजवळ राहत होते. त्या दोघांशी खुप छान मैत्री झाली होती. एकदा तिघांनी बाहेर फ़िरण्याचा विचार केला,
  त्यांनी रविवारच्या सुट्टीत फ़िरण्याचे ठरवले. मग रविवारच्या दिवशी ३ मित्र जंगलातुन नदीकाठावर, नदीकाठावरुन दुसरा गावात. संध्याकाळ झाल्यावर तिघे आपापल्या घरी आले. मग शाळेत काही दिवसांनी राहुलची मुलांशी मैत्री झाली. त्यात जयदिप नावाचा मित्र झाला. तो बिल्डींगच्या थोड्या लांब राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्यावर जयदिपने मधमाशाच्या पोळे काडण्याचा बेत बनवला. मग सुट्या पडल्यावर एके दिवशी सकाळी ते चार मित्र रानात मधमाशाच्या शोधात गेले. मग एक चांगले मधमाशाचे पोळे दिसले, मग जयदिप झाडावर चढला. आणि कौत्याने पोळा काढण्यास सुरुवात केली. खाली विकी आणि राहुल एक प्लास्टिकची पसरट घेऊन उभे होते. मग वरची मध त्या कागदावर पडायला लागली. मध काढून झाल्यावर तिघांनी मनभरुन मध खाली. एके दिवशी राहुलच्या वडिलाँची परत मुंबईत बदली झाल्याने त्याला परत मुंबईला जावे लागले. मग विक्की आणि जयदिपशी शेवटची भेट झाली.

Friday, November 9, 2018

नदी

                                           नदी
    रायगड जिल्यातील एका लहानशा गावात राहणारा कल्पेश हा लहानपणी शहरात राहिल्यामुळे त्याला शहराची ओढ लागली होती. तो शाळेत असताना त्याला विचार आला कि आपण एकदा पाण्यात पोहायचे. मग मित्र त्याचे रानातील प्रत्येक जागा ओळखुन असल्याने त्याने विचार केला की आपण रानात फ़िरायला जायचे. मग शनिवारी ४ मित्रांनी योजणा करुन झाल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता घरातुन निघाले. सोबत खाण्यासाठी थोडाफ़ार खाऊ घेतला. आणि थेट रानाकडे.. मग रानात गेल्यावर करवंदी, बोर असे रानातील फ़ळे खाऊन खुप फ़िरले. नंतर नदीजवळ आल्यावर कल्पेशने मित्रांना सांगितले कि, चला आपण अंघोळ करु. मग मित्रांनी आप-आपली कपडे काढून अंघोळीला पाण्यात उड्या टाकल्या. मग तासभर अंघोळ झाल्यावर घरी जायला निघाले. तेवढयात मागचा मित्र पाण्यातच होता, तो म्हणाला की, "तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो". हे एेकुण बाकीचे मित्र घरी निघाले. मग एक मित्र खुपवेळ पाण्यात खेळुन बाहेर येताना त्याचा पाय कोणीतरी आत खेचत असल्याचे भासले. आणि तो आत खेचत गेला. त्याने ओरडण्याचा खुप प्रयत्न केला, पण सगळे फ़ुकट गेले. शेवटी त्याचा म्रुत्यु झाल्याचे कळले.

Thursday, November 8, 2018

काॅलेज

                                                  काॅलेज
      डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.

घड्याळ


Wednesday, November 7, 2018

दिवाळी

                                      दिवाळी
      एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच घराच्या बाहेर फ़टाके फ़ोडायला गेलो. फ़टाके फ़ोडताना सोबत मित्रही होती तेव्हा खुप मज्जा येत होती.
      मग तेव्हा आम्ही ३ मित्र दिवाळीच्या दिवशी फ़टाके वाजवायला जंगलात गेलो. मग जंगलात आम्हाला एक मोठी कातीन दिसली. ती कातीन दिसायला भयंकर होती. तेव्हा त्या कातीनने आमच्याकडे जाळ फ़ेकला, मग आम्ही त्या जाळीत फ़सलो, मग आमच्याकडे फ़ुलबाजे होते. तर ते जाळुन आम्ही जाळ्यातुन बाहेर निघलो. मग आम्ही विचार केला की, या कातीनीला मारावे लागेल. नाहितर ही आम्हाला मारेल, मग आमच्याकडे काही राॅकेट आणि काही बाॅम होते. मग आम्ही राॅकेटला बाॅम लावला आणि असे १० राॅकेट कातीनवर सोडले. मग तेव्हा कातीनवर खुप मोठा स्फ़ोट झाला. जे १० राॅकेट होते. ते कातीनच्या अंगावर फ़ुटले. आणि कातीनला एक मोठी आग लागली आणि कातीन मेली. मग आम्ही तिथुन घरी आलो.

Monday, November 5, 2018

बेकार गाव

                                बेकार गाव
     महाराष्टात एक असे नावाजले गाव आहे, की त्याचे नाव घेतले की, हसायला येते. एकदा गावात लाईट गेली होती. आणि तिही दिवाळीत. मग बाहेरच्या गावात लाईट होती. आणि मग गावातला वायरमन असुन गावातील लोकं अशीच अंधारात बसली, पण त्यांनी लाईट का गेली ? याची चौकशी केलीच नाही. त्यावेळी काही एक-दोन घरातील लोकांनी वायरमनला बोलावुन लाईट बनवली.

Saturday, November 3, 2018

मासे

                                                 मासे
   एका छोट्याशा गावात रवि नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. एकदा शाळेत त्याचा ५वी ला प्रथम क्रमांक आल्याने त्याला शाळेतुन त्याला बक्षिस मिळाले. त्याचबरोबरच त्याला शाळेतुन स्काॅलरशिप मिळाली. तो गरीब घरातुन असल्याने त्याच्या घरातील लोकांचा मासेमारी व्यवसाय होता. त्याच्या घरात त्याचे वडील रोज नदिवर मासेमारी करायला जात होते. एकदा त्याच्या वडीलांची तबियत अचानक खराब झाल्याने रविलाच मासेमारी करायला जावे लागले. रवि नदीवर गेल्यावर त्याने मासे मारायला सुरुवात केली. २-३ तास त्याला काहीच हाती लागले नाही. अचानक एक मोठा मासा फ़सल्याचे त्याला वाटले. त्याने मासे खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खेचायला आलेच नाही. शेवटी त्याला जाताना माणसे दिसली. त्यांना त्याने हाक दिली. त्या माणसांनी मासा खेचण्याचा प्रयत्न केला. तर एक मोठा ३० किलोचा मासा त्याला मिळाला. तेव्हा त्याने तो मासा बाजारात विकला. तर त्याला खुप पैसे मिळाले. मग ते पैसे घेऊन तो घरी गेला. तर घरात वडील खुप खुश झाले.

Friday, November 2, 2018

मुंगुस

                                      मुंगुस
    एक विश्वास नावाचा मुलगा होता. तो नुकताच १०वी ला होता. शाळेत गेल्यावर मुलांशी मस्ती आणि सरांचा मार खाणे असा त्याचा स्वभाव असला तरी घरात त्याची वागणुक चांगली होती. एकदा असाच शाळेतुन घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात एक मोठा मुंगुस दिसला. मुंगुस बघताच तो थोडा घाबरला, तो मुंगुस १० मी. तिथेच असल्याने त्याला वाटले की, तो कुणाच्यातरी शोधात आहे. असे त्याला वाटले, मग मुंगुस गेल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर घराच्या बाजुला लोकांची गर्दी जमली. त्याने घरात पाहुण बघितले तर, घरात रक्ताचे डाग होते. आणि किच्चनच्या रुममध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असल्याने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याने पाहिले तर तो तिथेच हादरला. " एक मोठा साप मरुण पडला आहे, आणि त्याचे रक्त सगळीकडे पाणगले आहे." तेव्हा बाजुचे काका घरात आले. मग त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या घरात साप घुसलेला, आणि त्या सापाच्या मागे एक मुंगुस होता. त्या मुंगुसाने त्याला मारले असावे, असा अंदाज होता. तेव्हा विश्वासला लगेच लक्षात आले की आपण रस्त्यात जो मुंगुस बघितलेला होता. तो तोच होता म्हणुन. मग घरात कोणीच नसल्याने घरातुन साप बाहेर काढला, व पुर्ण घर साप केले. मग घरात त्याची आई आल्यावर झालेला प्रकार त्याने सांगितला.

Thursday, November 1, 2018

घोण

                                       घोण 
       एका लहानशा खेडेगावात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो तिसरीमध्ये शिकत होता. सकाळी १० वा. शाळेत गेल्यावर दुपारी २ वा. घरी जेवायला यायचा आणि जेवुन लगेच शाळेत जायचा. ५.५० वा. शाळा सुटली की तो घरी यायचा. घरी आई-बाबा, एक लहान बहिण २ वर्षाची. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर दुपारी जेवायला घरी आला. जेवायला आल्यावर आईने जेवणाचे ताट वाढले, आणि आई बाहेर गेली. तेथे त्याची छोटी बहिण खेळत होती. अचानक तिथे एक मोठी घोण आली. मग हे करणने बघितले, मग करणने त्या घोणचा रस्ता आडवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घोण थांबतच नव्हती. सारखी पुढे येत होती. मग घरात एक मोठी काठी होती. त्या काठीने त्या घोणला मारले. त्या घोणचे दोन तुकडे केले, तरीही ती जिवंत असल्याचे त्याला आढळले. मग त्याने बतितले राॅकल त्या घोणवर ओतले आणि आग लावली. तेवढयात त्याची आई आली आणि म्हणाली, काय पेटवलेस ? मग तो बोल्ला की घोण आहे. हे बोलताच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर हा प्रकार मित्रांना सांगितला तर मित्रांनी त्याची वाह ! वाह ! केली.