एक बोरीवली नावाचे शहर होते. त्या शहरामध्ये एक मयुर नावाचा मुलगा राहत होता. त्याला १० वीत ६५% गुण मिळाल्यामुळे त्याचे अॅडमिशन एका कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये त्याचे नवीन मित्र झाले. काही मित्रांकडे मोबाईल होते.
त्यामुळे त्यालाही वाटत होते की, आपल्याकडे मोबाईल असावा. मग त्यादिवशी त्याने आपल्या वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी त्याला मोबाईलसाठी नकार दिला. मग त्याने विचार केला की काम करुन मोबाईल घ्यायचा. तो अंधेरीमध्ये रोज कॉलेजला जायचा त्यामुळे त्याचा लोकलने प्रवास होत असे.
एकेदिवशी कॉलेजमधुन निघायला उशीर झाल्यामुळे त्याने चालत्या लोकलला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने ती लोकल पकडली. कारण समोरच्या एका प्रवाशाने त्याचे हात पकडल्यामुळे तो लोकल पकडू शकला; मग त्यादिवशीचा लोकलचा प्रवास त्याने घरात कुणालाच सांगितला नाही.
काही दिवसानी
तो एक छोटेमोठे अर्धदिवसाचे काम करु लागला. आणि त्याच्याकडे मोबाईल घेण्याइतके पैसे झाल्याने त्याने विचार केला की मोबाईल कॉलेज सुटल्यावर एका चांगल्या दुकानातुन घ्यायचा. मग दुसरा दिवशी तो मोबाईलच्या दुकानातुन बाहेर येताना त्याला लक्षात आले की खुप वेळ झाला आहे, आता लवकरात लवकर घरी गेले पाहिजे. त्यामुळे त्याने घरी जाण्यासाठी धाव घेतली. स्टेशनवर पोचल्यावर त्याची लोकल सुटताना त्याला दिसला. त्याने जोरात लोकलकडे धाव घेतली. लोकलचा लोखंडी खांब त्याने जोरात पकडल्याने तो लोकलमध्ये चढला पण त्याची पक्कड घट्ट नव्हती. कारण एका हातात मोबाईल असल्याने त्याची पकड सैल होती. अचानक त्याच्या हातातुन मोबाईल रेलवेच्या बाहेर पडला. मोबाईल पडताच त्याने लोकलमधुन उडी मारली. उडी मारल्यामुळे पडलेला मोबाईल मिळाला पण अचानक समोरुन लोकल आली आणि त्याचे जागीच
प्राण गेले. तेव्हा लोकलमधील त्याचे काही मित्र त्याला शोधत येताना त्याचे शरिर त्यांना मिळाले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले.
त्यावेळी त्याचा एक मित्र तेथे म्हटला की जर त्याच्या हातात मोबाईल नसता तर, हा प्रसंग बघायला मिळालाच नसता..
*** समाप्त ***