पालघर तालुक्यातील नालासोपारा गावात एक रोशन नावाने मुलगा राहत होता. त्याचे शिक्षण १५ वी पास असल्याने त्याला गोरेगावात एका मोठया कंपनीत नोकरी मिळाली.
त्याचे काम बघुन ऑफ़िसमधले सर्वजण त्याला ओळखु लागले. मुळात तो मे महिन्यात कामाला लागल्याने च्याचे काम कंपनीच्या मालकाला एवढे आवडले. की त्याला कंपनीच्या मालकाने बोलावुन त्याची स्वतंत्र भेट घेतली व त्याचे कौतुक केले. त्यामुळे ऑफ़िसमधले त्याचे एक व्यक्तीचित्र तयार झाले. आणि तो सगळयांचा आवडता झाला.
रोज सकाळी ६:०० वाजता उठून मग ७:१० मी. स्टेशनवर पोहचायचे आणि ७.२० ची अंधेरी लोकल पकडून ऑफ़िसमध्ये ८:३० ला पोहचणे. 
एका दिवशी रात्रभर
भरपुर पाऊस पडला त्यामुळे सकाळीच रेलवे स्टेशनवर भरपुर पाऊसाचे पाणी साचले.
तरीही कामाला जाणार कसे ? हा प्रश्न त्याला पडला. मग कसेबसे पाण्यातुन चालत जाऊन रेलवे स्टेशनवर पोहचला. पण तेथे पोहचल्यावर त्याला कळले की गाड्या २० मी. उशीराने धावत आहेत. तरीही त्याने ऑफ़िसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आणि तो ऑफ़िसमध्ये ९:३० मी पोहचला.
ऑफ़िसमध्ये बहुतेकजण आलेच नाही तरीही त्याने आपले कामाच्या जबाबदारीमुळे हे सर्व केले. नंतर ऑफ़िसमधुन बाहेर आल्यावर स्टेशनवरुन लोकल पकडली. नालासोपारा स्टेशनला पोहचल्यावर पायभर पाणी. मग कसेबसे घराचा रस्ता बघितला आणि इतर प्रवाशींसोबत जाऊ लागला. रस्त्यात प्रवाशी कमी होऊ लागले. रस्त्याने तो एक्टाच होता. अचानक जोराचा वारा आणि पाऊस सुरु झाला. वारामुळे विजेची तार तुटून रस्त्यावर पडली. त्याने आजुबाजुला पाहिले तर त्याला इतर ठिकाणी विजेची बल्प चालु असलेले त्याच्या नजरेस आले.
तेव्हा त्याने त्याक्षणी विज-ऑफ़िसला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कॉल लागला नाही. अचानक गॅस-सिलेंडरची गाडी पाण्यातुन येताना दिसली. त्याने विचार केला की जर की विज बंद कशी करावी, तेव्हा त्याला आठवले की रस्त्यात विजेचा डेपो होता. मग कसाबसा कडेकडेनी जाऊन त्याने विज बंद केली.
त्यावेळेस रस्यावरची लोकं त्याला पाहत होती पण त्यांना हे माहीत नव्हते की पुढच्या रस्त्यावर विजेची तार पडली आहे. मग जेव्हा लोकांना कळले की विजेची तार पडल्यामुळे त्याने विज बंद केली. हे कळल्यावर गावातील लोकांनी त्याचे कौतुक केले. आणि दुसरा दिवशी गावातील सरपंचानी त्याचे कौतुक करुन त्याचा सत्कार केला. ऑफ़िसमध्येही त्याचे भरभरुन सर्वांनी कौतुक केले.
*** समाप्त ***