शेरास सव्वाशेर
नानाकाका घुंगरकाठी आपटत शेताच्या बांधावरुन फ़िरुत होते. वारावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निब्बर, सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक ! नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वषॅभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता.
"निसगाॅने करूणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली," असे गाणे गुणगुणत नानाकाका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदिरमामा कोपले होते. नानाकाकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्यात पञ्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धअधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तरफ़ेसारखी हलकी लांब फ़ळी बसवली. पिंपावरच्या फ़ळीच्या टोकाला तळलेली भाजी ठेवले. अंधार पडला आणि नानाकाका शेतावरुन घरी आले. सर्वञ सामसून उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भाज्यांच्या खमंग वासाने सर्वञ उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फ़ळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसले. घाईघाईने तीन-चार उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरुन गेले.
सकाळी सकाळीच अधीरतेने नानाकाका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफ़ल झालेली पाहून त्यांना खुप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नानाकाका घरी आले.
परत दुसरा दिवशी सकाळी नानाकाका पिंपाजवळ गेले. फ़ळीवरचे भजी फ़स्त केली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फ़ारच आश्चयॅ वाटले. हा काय प्रकार आहे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले.
संध्याकाळी अंधार पडायला सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फ़ळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. शांतता पसरलेली आणि उंदरांची फ़ौज स्वारीवर निघाली. सर्वञ भज्यांचा वास सुटला होता. मोठया अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. व एक उंदीर फ़ळीवरुन पुढे सरसावला. प्रत्येकाने एक-एक करुन तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदिरमामांची युक्ती पाहून नानाकाकांनी आपल्या कपाळावर हात मारुन घेतला.
*** समाप्त ***
नानाकाका घुंगरकाठी आपटत शेताच्या बांधावरुन फ़िरुत होते. वारावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निब्बर, सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक ! नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वषॅभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता.
"निसगाॅने करूणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली," असे गाणे गुणगुणत नानाकाका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदिरमामा कोपले होते. नानाकाकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्यात पञ्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धअधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तरफ़ेसारखी हलकी लांब फ़ळी बसवली. पिंपावरच्या फ़ळीच्या टोकाला तळलेली भाजी ठेवले. अंधार पडला आणि नानाकाका शेतावरुन घरी आले. सर्वञ सामसून उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भाज्यांच्या खमंग वासाने सर्वञ उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फ़ळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसले. घाईघाईने तीन-चार उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरुन गेले.
सकाळी सकाळीच अधीरतेने नानाकाका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफ़ल झालेली पाहून त्यांना खुप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नानाकाका घरी आले.
परत दुसरा दिवशी सकाळी नानाकाका पिंपाजवळ गेले. फ़ळीवरचे भजी फ़स्त केली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फ़ारच आश्चयॅ वाटले. हा काय प्रकार आहे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले.
संध्याकाळी अंधार पडायला सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फ़ळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. शांतता पसरलेली आणि उंदरांची फ़ौज स्वारीवर निघाली. सर्वञ भज्यांचा वास सुटला होता. मोठया अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. व एक उंदीर फ़ळीवरुन पुढे सरसावला. प्रत्येकाने एक-एक करुन तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदिरमामांची युक्ती पाहून नानाकाकांनी आपल्या कपाळावर हात मारुन घेतला.
*** समाप्त ***