Translate

Wednesday, November 28, 2018

मंदिर

                 मंदिर
 

     ठाणे जिल्ह्यातील एका गावात एक १२ घरे मिळुन चाळ होती. त्या चाळीत काही मराठी माणसे तर काही इतर जातीतील लोक त्या चाळीत राहत होते. त्या चाळिचा मालक हा एक म्हतारा ५० वर्षाचा असुन तो त्या चाळितील देखरेख करत असे. चाळित एक शंकर देवाचे मंदिर होते. त्या मंदिरात तो सकाळ-संध्याकाळ आरती करत असे. एकदा पावसाळ्यात नदिला पुर आल्यामुळे नदिचे पाणी चाळीत आले. कारण चाळ नदीपासुन जवळ असल्ल्याने चाळितील घरामध्ये पाणी भरले. शेवटी पाणी मंदिरातील शंकराच्या पिंडीपर्यत जाणार होते. तेवढयात त्या माणसाने मंदिरात दिवा लावल्यामुळे पाणी कमी होत गेले. तेव्हापासुन मंदिरात लोकांची खुप गर्दी होत गेली. एकेदिवशी चाळिचा मालक अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याची बायको आजारी पडल्याने तिचे निधन झाले. शेवटी त्या मालकाच्या मुलांकडे चाळितील खोल्याचे अर्धे-अर्धे हिस्से झाले. पण ती चाळ तशीच राहिली.



-------------------------------------------**************--------------------------------------------------