Translate

Saturday, October 13, 2018

पाटिल बंधू ( एक रिक्शावाला )

              रत्नागिरी जिल्यातील पावस नावाचे एक गाव होते. त्या गावात दिपक पाटील नावाने एक रिक्शावाला राहत होते. त्याला गावातील सर्व लोक पाटील बंधू असे म्हणत. पाटील गावात एकटेच होते. ते १५वीत असताना आई-वडीलांचे बस अपघातात दु:खद निधन झाले.  तेव्हा ते नुकतेच २२ वर्षाचे होते. ते नोकरीच्या शोधात मुंबईला एकदा-दोनदा जाऊन आले पण हवी तशी नोकरी मिळालीच नाही म्हणून जबरदस्तीने त्याला रिक्शा चालवावी लागली.
    एकदा गावात एक नविन पाहुणे आले होते. तेव्हा पाटिलांनी त्यांना बसस्टॅापवरुन गावात आणले. गावात आल्यावर पाटिलांनी प्रवासींचे सर्व सामान रिक्शातुन बाहेर ठेवले आणि पाटिल तिथुन निघुन गेले.



 कारण हे गाव पावस गावापासुन २० कि.मी अंतरावर होते. म्हणून पाटलांनी प्रवाशींकडे घाई करुन त्यांच्याकडून पैसे घेतले आणि तिथून निघुन गेले. पाटील गेल्यावर प्रवाशांनी त्यांचे सर्व सामान घरात घेताना एक बॅग तर रिक्शातच राहिली. मग आता ती बॅग आता कशी मिळेल, या चिंतेने ही बाब पुर्ण गावभर पसरली. गावातल्या काही लोकांनी पाटिलला आलेले पाहिले होते. त्यावेळी त्यांनी पाटीलांबद्दल काहीच सांगितले नाही. गावात पाहुणी नविन असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनादेखिल पाटीलांबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणून पाटलांवर नुकताच संशय घेतला. दुसरा दिवशी पाटिल गावात आले तेव्हा त्या प्रवाशांनी त्यांना पाहताच शिवीगाळ करायला सुरुवात केली. पाटील बॅग परत करायला आले आहेत हे त्यांना माहितच नव्हते. पाटलांना हा प्रकार आवडला नाही म्हणून पाटलांना कडक आवाजात म्हटले,

 
  " तुमची वस्तु परत करायला आलो आणि तुम्ही माणसाला न आेळखता त्यावर आरोप कसा लावू शकता ?" लगेचच पाटलांनी रिक्शातून बॅग आणली आणि घरात प्रवाशीला दिली. बॅग देताच घरातील सर्वाचा राग शनातच गायब झाला. मग प्रवाशींनी पाटलांची माफी मागितली.


                                         *** समारोप ***