Translate

Saturday, October 20, 2018

लालच चे फ़ळ कधीही वाईट असते

       

एका गावात अजय आणि आकाश नावाने दोन मित्र राहत होते.  सुरज हा चांगल्या घरातला होता. तर आकाश हा गरिब होता. तरीही दोघांमध्ये वय समान होते.  

ते दोघे ५वी च्या वर्गात शिकत होते. उनाळाच्या सुट्टया पडल्यामुळे दिघांना वाटले की काहीतरी वेगळे करायला हवे. मग त्यांनी त्यांच्या आजोबांच्या तोंडून एकदा ऐकले होते की, जंगलात काही जादू सारखे आहे. ते कोणालाच मिळत नाही.
    
  काही वेगळं घेण्याच्या शोधात गेले. तेव्हा एका घनदाट जंगलात गेले. तेथे त्यांना एक दगड मिळाला. दगड सामान्यच वाटत होता. तेव्हा आकाशला खुप तहान लागली होती तेव्हा त्या दगडातून पाणी येताना आकाशने पाहिले पाणी पिताना अचानक दगड कमकुवत आहे. हे अजयच्या लक्षात आल्यावर त्याने आकाशला मागे ओढले.

 मग अजयने तो दगड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दगडातुन काहीतरी दिसले. ते पाहण्यासाठी दोघांनी दगड तोडण्याचा प्रयत्न केला. दगडाचा जोरात आवाज झाला आणि दगडातुन एक हिरवा रंगाचा चमकणारा दगड निघाला.
    
  तो दगड घेऊन दोघे घरी गेले. रस्त्यात आकाश अजयला बोल्ला की हा दगड आज माझ्याकडे ठेवतो. उद्या तु ठेव. असे बोलुन दोघे घरी गेले. मग आकाश घरी गेला तेव्हा त्याच्या घरात कळले होते की तो जंगलात गेला होता. मग तो तेव्हा एकटाच मनात विचार लागला की, माझ्याबद्दल सर्व विसरुन जाऊदे. आणि ते खरे होते. तेव्हा आकाश घाबरतो लगेच अजयकडे जाऊन संपुर्ण घटना सांगतो. तेव्हा अजय बोल्ला की तु गरीब आहेस तर तुझ्यासाठी मोठे घर माग. तेव्हा ते दोघे आकाशच्या घरी जाऊन पाहतात. तर घर मोठे झालेले दिसते. मग आकाश अजुन एकदा असे मागतो की, मी धनवान व्हावा. तेव्हा त्याचे कपडे क्षणात बदलतात. मग आकाश म्हणतो की या दगडाची आता मला काहीच गरच नाही तेव्हा तो दगड अजय स्वत: कडे ठेवतो. आणि तो मागतो की माझ्याकडे पैशाची कमतरता कधीच भासू नये. जेथे नजर जाईल तेथे पैसाच मिळेल. तेव्हा त्याच्या सभोवती वस्तू गायब होऊन त्याला सगळीकडे पेैसे दिसतात.
 
 मग थोड्या वेळाने त्याला भुक लागते, तेव्हा तो त्या दगडाकडे बघायला जातो तर दगडही पेैसे झालेले दिसते. त्यामुळे तो तेथे त्रासुन जातो आणि शेवटी आत्महत्या करतो.
   
                                      *** समाप्त ***