Translate

Friday, November 30, 2018

मित्राशी भेट

                मित्राशी भेट 
ठाणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहूल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात नविन असल्याने सुरुवातीला त्याचे फ़ारसे मित्र नव्हते. हळुहळु त्याचे गावात नविन मित्र झाले. तो जेव्हा ५ वी ला होता. तेव्हापासुन ते आता त्याची १५ वी झाल्यानंतर त्याच्या मित्रांशी बोलने-चालने फ़ारसे कमी झाल्याने तो नेहमी अस्वस्थ असायचा. कारण स्थलांतर दुरच्या शहरात झाले होते. 

        एकदा तो असाच मित्रांना भेटायला गावात आला होता. तेव्हा काही मित्रांशी भेट झाली. तर काही मित्र कामात गुंतल्यामुळे भेट होऊ शकली नाही. कारण तो सकाळी ६ वा. राह्त्या घरातुन निघाला होता. व मित्रांकडे ११ वा. पोचला. तरीही काही मित्रांना सुट्या नसल्याने त्याला घरी परतावे लागले. 

Company भाग - ३

        Company भाग - ३

     मुंबई शहरातील एका नामवंत परिसरात एक अजय नावाचा मुलगा कामाला होता. तो कामाच्या ठिकाण्याहुन लांब अगदी ३ तास अंतरावर असल्याने तरीही त्याला त्याच्या कामातील साहेब कामाला लवकर बोलवत. एकदा काम जास्त असल्याने त्याला खुपवेळ थांबवले. अगदी ८:३० ते ९:१० वा.पर्यत.. मग त्याचा पगार इतका फ़ारसाही नव्ह्ता. त्यामुळे घरातील माणसे त्याला सारखे बजावुन सांगत की, तु काम सोडुन दे.. नको जाऊ कामाला ! घरीच बस ! मग एका दिवशी त्याने त्याच्या साहेबाला विचारले की, साहेब माझा पगार वाढवा.. नाहितर मला काम सोडावे लागेल.. तेव्हा हे बोलताना साहेबांनी त्याला काही पर्याय दिले..

 १) तुला जास्तीत जास्त ११ हजार रु. वाढवुन देऊ शकतो.

 २) तुला काम सोडायचे असेल तर, तुला २० दिवस अजुन काम करुन तु काय शिकला आहे. हे इतर लोकांना  शिकवायला लागेल. तेव्हा तुझा पगार आणि अनुभव अर्ज देता येईल.

३) तुला आजच काम सोडायचे असेल तर, तुला काहीच मिळणार नाही.

     तेव्हा थोडावेळ विचार करुन त्याने दुसरा पर्याय निवडला. पण संध्याकाळी झाल्यावर त्याच्या साहेबाने वेगळाच चुकीचा आरोप लावल्यामुळे त्याला काम स्वत: हुन सोडावे लागले.