Translate

Wednesday, November 28, 2018

मंदिर

                 मंदिर
 

     ठाणे जिल्ह्यातील एका गावात एक १२ घरे मिळुन चाळ होती. त्या चाळीत काही मराठी माणसे तर काही इतर जातीतील लोक त्या चाळीत राहत होते. त्या चाळिचा मालक हा एक म्हतारा ५० वर्षाचा असुन तो त्या चाळितील देखरेख करत असे. चाळित एक शंकर देवाचे मंदिर होते. त्या मंदिरात तो सकाळ-संध्याकाळ आरती करत असे. एकदा पावसाळ्यात नदिला पुर आल्यामुळे नदिचे पाणी चाळीत आले. कारण चाळ नदीपासुन जवळ असल्ल्याने चाळितील घरामध्ये पाणी भरले. शेवटी पाणी मंदिरातील शंकराच्या पिंडीपर्यत जाणार होते. तेवढयात त्या माणसाने मंदिरात दिवा लावल्यामुळे पाणी कमी होत गेले. तेव्हापासुन मंदिरात लोकांची खुप गर्दी होत गेली. एकेदिवशी चाळिचा मालक अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याची बायको आजारी पडल्याने तिचे निधन झाले. शेवटी त्या मालकाच्या मुलांकडे चाळितील खोल्याचे अर्धे-अर्धे हिस्से झाले. पण ती चाळ तशीच राहिली.



-------------------------------------------**************--------------------------------------------------

Sunday, November 25, 2018

शाळेत १५ आॅगस्ट साजरा

                             शाळेत १५ आॅगस्ट साजरा
 

         
   ठाणे शहरातील एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब होता. लहानपणापासुन त्याच्या घरची परिस्थिती खुप बिकट होती. घरात वडील,आई, एक भाऊ असा त्याचा कुटूंब होता. तो प्राथमिक शाळेत शिकायला होता.
  

             एकदा शाळेत १५ आॅगस्टचा कार्यक्रम होता. त्यादिवशी राम सकाळी लवकर ६:३० वा. घरातुन निघाला. आणि झेंडा विकत घ्यायचा असल्याने तो दुकानात गेला. तेव्हा काही दुकाने उघडी नसल्याने तो कंटाळला. शेवटी एका दुकानात त्याला झेंडा मिळाला. लगेच तो शाळेत पोहचला. शाळेत झेंडा फ़डकवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रम झाल्यावर प्रमुख पाहुण्याना शाळेतर्फ़े नास्टा असल्याने पाहुण्यांनी तो आवडीने खाल्ला. मग काहीवेळाने टाॅयलेट बाहेर पाहुण्यांच्या रांगा लागल्या. टाॅयलेट  असे होते की ते वर्षभर बंद असल्याने त्यात पाण्याची सोय नव्हती. तरीही पाहुण्यांनी सोबत बिसलरी बाट्ल्या सोबत नेल्या. काही पाहुण्यांची तबियत खराब असल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. तेव्हा  १५ आॅगस्ट हा पाहुण्यांचा चांगलाच दवाखान्यात गाजला.


-------------------------------------*****************-------------------------------------------

Saturday, November 24, 2018

शाळेचा माॅनेटर

                     शाळेचा माॅनेटर 


           एका गावात कल्पेश नावाचा मुलगा राहत होता. तो १० वी ला असल्याने शाळेत हुशार विद्यार्थी असल्याने वर्गात त्याची माॅनिटर म्हणुन निवड झाली. तो हुशार असल्याने तो सर्व शिक्षकांचा आवडता होता. शाळेत एकदा सराव परिक्षा होती. तेव्हा मॅडमना काम जास्त असल्याने सरांनी त्याला वर्गाकडे लक्ष द्यायला सांगितले. त्व्हा काही मुले मस्ती करत होती. खुपवेळ असाच गेला. त्याच्या सांगण्याहुन, फ़्ळ्यावर नावे लिहुनही ती ऎकत नव्हती. मोनिश , राकेश, नितेश, शिवाजी, भुषण अशी ५ ते ६ जण मागे बसून मस्ती-गोगाट करत होती. तर बाजुला मुली शांत बसल्या होत्या. मुलांचा गोगाट एेकुन मुलीही बोलू लागल्या. तेव्हा शिवाजीकडे मोबाईल होता.

         कल्पेशला हे माहीत असल्याने कल्पेश शिवाजीच्या कानात ह्ळुच बोल्ला की, काय रे ! पिच्चर आहे का ? मग शिवाजी बोल्ला आहे ना ! "HD" आहे. पण मॅडम मोबाईल घेतील म्हणुन खिशात ठेवला आहे. मग कल्पेश बोल्ला की, मी आहे ना ! सर नाही घेणार मोबाईल.. तु काढ खिशातुन... तेव्हा कल्पेश बाकीच्या मस्ती करत असलेल्या मुलांकडे गेला. तेव्हा त्यांना बोल्ला, "तुम्हाला मी पिच्चर बघुन देतो. पण गोगाट करायचा नाही. तेव्हा मुलांनी हे मान्य केले. आणि काही वेळातच मुले अचानक शांत झाली. हे मुलींनी पाहताच त्यांना आश्चर्य झाला. तेव्हा एका मुलीने मुलांकडे पाहिले तर्, तीला दिसले की मुले शिवाजीच्या मोबाईलमधुन काहीतरी बघत होता. तेव्हा मुले पिच्चर बघताना लाजत असल्याने मुली वेगळाच अर्थ काढत होती.

        काही वेळाने मॅडम वर्गात आले तेव्हा त्यांना वर्ग शांत दिसला. तेव्हा सरांनी शांत बसण्याचे कारण विचारल्यावर एका मुलीने सांगितले की, मॅडम मुले शिवाजीच्या मोबाईल मधुन काहीतरी बघत होती. मॅडमने शिवजीला विचारले की काय आहे मोबाईल मध्ये मला दाखव.. तेव्हा शिवाजीने मॅडमला मोबाईलमधले दखवताच मॅडमला ते विचित्र दिसले. त्यामुळे मॅडमने त्याला त्याचा मोबाईल लगेच दिला. तेव्हा तेथे अक्षय नावाचा बसला होता. त्याने विचारले की, शिवाजी काय दाखवले की, मॅडमने तुझा मोबाईल लगेच दिला ? तेव्हा शिवाजी बोल्ला, " अरे मोबाईलमध्ये पिच्चरच अशे आहेत की, मॅडला लाज वाटली. म्हणुन मोबाईल दिला.



--------------------------------------------**********------------------------------------------------------

Friday, November 23, 2018

शाळेची सहल डोंगरावर

          शाळेची सहल डोंगरावर
                                                                                                                               दि. १४ जुलै २०१० 
 
 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
           

          ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.

            आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.

                                                            
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------

Thursday, November 22, 2018

शाळेत आणली दारु

                                                               शाळेत आणली ताडी!! 


  



        एकदा मी शाळेत गेलो. तेव्हा शाळेत परिक्षा होती. आज शेवटचा पेपर असल्याने मुलांचा शाळा सुटल्यावर फ़िरण्याचा विचार चालला होता. तर एकीकडे दोन मित्र रोहन आणि मोहन या दोघांचा वेगळाच विचार चाल्ला होता.

     
        पेपर संपल्यावर दोन तास हे शारिरीक शिक्षण असल्याने मुलांना बाहेर खेळायला जायचे होते. तेव्हा सरांनी बाहेर सोडलेच नाही. मग तेव्हा त्यादिवशी पेपर संपल्यावर ताडी पिण्याचा रोहन आणि मोहन यांचा विचार होता. आणि दुसरा दिवशी शिवटच्या दिवशी त्यांनी २ बाटल्या भरुन ताडी आणल्या. मग त्या दोघांना कळले की बाहेर जायला मिळणार नाही. तेव्हा काही मुले मस्तीही करत होते. तेव्हा रोहनने बॅगीतुन ताडीची बाटल्या काढल्या. 


      
       एक बाटली रोहनने घेतली तर एक बाटली मोहनने घेतली आणि दोघांनी दोन-दोन घोट घेतल्यावर ताडी चढली. मग वर्गात मुली होत्या. मग मुलींच्या जवळ जाऊन वेगळ्या प्रकारे वर्तन करु लागले. "चल येते का, फ़िरायला, माझी बायको होशील का ? अशा प्रकारे वेगवगळी क्रुत्ये करु लागली. तेव्हा एका मुलाने सरांना बोलावुन आणले. तेव्हा ह्या दोघांनी बघताच रोहन मुलाला बोल्ला की काय रे ! हिच्या बापाला बोलावुन आणले का ? चांगलं केले. चला सासरेबुवा आमचे लग्न लावुन द्या. मग सरांनी त्यांची चांगलीच ताडी उतरवली. दोघांचा चेहरा बघण्यासारखा होता.